Wednesday 28 June 2017

आज आठवडी बाजार होता.
सौ बाजारातून आली. पिशवी खाली ठेवत, घाम पुसत म्हणाली," काय महाग होत्या भाज्या आज ? थोडी उशीरा गेले असते तर स्वस्त तरी मिळाल्या असत्या."

   पुस्तकातून डोके वर न काढता मी सहज बोलून गेलो," त्यापेक्षा बाजार संपता संपता गेली असतीस तर टमाटर, वांगी, कांदे, पालेभाज्या  या सर्व फुकट मिळाल्या असत्या."
                   ********

आत्ता आठ वाजून गेले तरी किचनमध्ये शुकशुकाट आहे. आज जेवायला मिळणार की नाही कळत नाही.
मी काही चुकीचे बोलून गेलो का मघाशी....?
मला तर काही आठवत नाही......

असो... शुभ रात्री !!
                                             == सुरेश इंगोले ==

No comments:

Post a Comment