#कुबेर_हम_भी_है_जोश_में
मावशी आली धावून .....
------------------------
स्वत:ची फजिती सांगायला धाडस लागते म्हणे. तेव्हा म्हटले सुरवात फजितीपासूनच करावी.
चाळीस वर्षापुर्वीची गोष्ट. १९७५ मध्ये आमचे लग्न झाले. नवी नवरी घरात आली. आठ दिवसांनी चुलत भावाचे लग्न होते. त्यामुळे आठ दिवस ती घरात असूनही तिच्याशी बोलण्याची संधी मिळत नव्हती कारण संपूर्ण घर पाहुण्यांनी भरलेले आणि संधी मिळाली तरी बोलण्याचे धाडस नव्हते. तो काळ असा होता की वडीलधा-यासमोर बोलताही येत नसे.
माझी मुंबईची मित्राची बायको संधी मिळवून द्यायचा आटोकाट प्रयत्न करीत असे. पण आम्ही मुलींच्या बाबतीत लाजाळूचं झाड. माझी थट्टा टोकाला जायची पण मी घाबरून शेतात पळून जाई. माझा चुलत भाऊ तिची खूप चेष्टा करायचा आणि ती ही त्याला प्रत्युत्तर द्यायची. असे आठ दिवस निघून गेले. आम्ही दुरूनच आमच्या सौ ला केवळ बघत बसायचो.
चुलत भावाच्या लग्नाला परत अमरावतीला गेलो. ( माझे लग्नही अमरावतीलाच झाले होते.) लग्नाच्या सगळ्या विधीत 'ही' एवढी उठून दिसत होती की अस्मादिकांचं लक्ष इतरत्र नव्हतंच. नव्या नवरीला घेऊन परत गावी आलो. दुस-या दिवशी पूजा घातली गेली. दोन जोडपी पूजेला बसलेली. माझा भाऊ अधून मधून त्याच्या बायकोशी बोलायचा तेव्हा मी त्याच्यावर डोळे वटारायचो. तो हसायचा.
दुस-या दिवशी अमरावतीला पूजेसाठी जायचे होते. आम्ही चौघे म्हणजे दोन्ही जोडपी ट्रेनने निघालो. माझा भाऊ प्रवासात दोघींशीही मनसोक्त गप्पा मारत होता. पण प्रवासात सुद्धा मी तिच्याशी बोललो तर कुणी पाहील तर नाही ना ही धाकधूक. वेडेपणाचा कळसच ! मधे एका स्टेशनवर चहा घेताना मी भावाला म्हटले, " भास्कर, चहा हवा का विचार तिला." तो म्हणाला, " अरे ! तू विचार ना !" तर मी डोळे वटारले.
अमरावतीला पूजा आटोपली. दुस-या दिवशी सकाळी अंबादेवीच्या मंदिरात ओटी भरायला जायचे होते. रिक्षात बसून निघालो. काहीतरी बोलायचे म्हणून मी हिंमत करुन विचारले," ओटी भरून लगेच निघायचे ना? " " थोडी खरेदी करायची आहे. " ती हळूच म्हणाली.
ओटीभरण व पूजा आटोपल्यावर आम्ही बाजूच्या मार्केटमधे गेलो. ती उत्साहाने दुकाने फिरू लागली. मला एक परिचित भेटले त्यांच्याशी गप्पा मारण्यात मी दंग झालो. त्या काळी विमा एजंट असल्यामुळे मी प्रत्येकाला गि-हाईक समजून वागायचो. त्यामुळे बराच वेळ आमच्या गप्पा रंगल्या. तेवढ्यात ती आली व मला म्हणाली, " पन्नास रुपये हवे होते. " मी खिशातील पन्नास रुपये तिला दिले आणि माझ्या डोळ्यासमोर वीज चमकली.
माझ्या खिशात फक्त दहा रुपये उरले होते. घरून निघताना मी खिशात किती पैसे आहे ते पाहिलेच नव्हते. घरून पैसे घेतलेच नव्हते. मला दरदरुन घाम फुटला. आता काय करायचे.!
रिक्षा करून आम्ही तिच्या माहेरी आलो. माझ्यासमोर एवढे संकट होते की रिक्षात तिच्या होणा-या स्पर्शाने सुद्धा माझ्या चित्तवृत्ती फुलल्या नाहीत. गावी कसे जायचे ? तिकिटाला पैसे कुठून येणार ? कुणाला मागायचे ? शरमेने काळाठिक्कर पडायची वेळ आली होती. रिक्षाचे पैसे चुकवून घरात आलो.
खिसा आता पूर्ण रिकामा झाला होता. मी घाम पुसत सोफ्यावर बसत होतो तोच आतून एक महिला बाहेर आली. माझ्याकडे बघून हसू लागली. " काय रे, ओळखलंस ना !" तिच्याकडे निरखून बघत मी म्हणालो, " तू मालती मावशी ना ! " तिने हसत हसत आपल्या मिस्टरांची ओळख करून दिली. " अरे हे आशाचे भाऊ लागतात ...दूरचे " मी चकित झालो. म्हणालो, " म्हणजे तू माझी मावशी आणि हिची वहिनी का ?" सगळे हसू लागले.
मी क्षणभर स्वत:ची व्यथा विसरलो. त्यांच्याशी गप्पांमध्ये रमलो. परत चिंता पोखरू लागली तेव्हा एक मार्ग सुचला की भावाला भेटून काहीतरी मार्ग निघेल. तेवढ्यात एक नातलग येऊन सांगू लागले की माझा भाऊ त्याच्या सासरी खेड्यावर गेलाय. माझे उरले सुरले अवसान गळाले.
आमच्या बोळवणीची पूर्ण तयारी झाली होती. सगळं सामान बांधून तयार झालं. रिक्षा आणायला कुणीतरी गेलं. मी रडकुंडीस आलो होतो. शेवटी विचार केला की प्रोफेसर साहेबांस ( सौ चे मोठे बंधू) स्पष्ट कल्पना द्यावी. होऊ झाली फजिती !
निघताना मी इतर ज्येष्ठांसोबत मावशीच्या पाया पडलो. " जोडीने पाया पड रे " मावशी म्हणाली. आम्ही पाया पडताच मावशीने माझ्या हाती शंभराची नोट दिली. त्या काळात .....शंभराची नोट.....
मंडळी....! माझी अवस्था काय सांगू ! आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन....साला मै तो साब बन गया ! आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. माझ्या डोळ्यासमोरून सारा घटनाक्रम सरकू लागला. आणि सगळी भीड सोडून मी बेधडक बायकोशी बोलायला सुरवात केली. भीड चेपल्यावर मी तिला माझी अवस्था विशद केली ......
आणि ती सहज म्हणाली," माझ्याकडे होते की पैसे...मला विचारायचे की !"
माझाच पोपट झाला.........
सुरेश इंगोले
अनिलहंबीर
Amey T Sonawane
With...
संतोष जगन्नाथ लहामगे
मावशी आली धावून .....
------------------------
स्वत:ची फजिती सांगायला धाडस लागते म्हणे. तेव्हा म्हटले सुरवात फजितीपासूनच करावी.
चाळीस वर्षापुर्वीची गोष्ट. १९७५ मध्ये आमचे लग्न झाले. नवी नवरी घरात आली. आठ दिवसांनी चुलत भावाचे लग्न होते. त्यामुळे आठ दिवस ती घरात असूनही तिच्याशी बोलण्याची संधी मिळत नव्हती कारण संपूर्ण घर पाहुण्यांनी भरलेले आणि संधी मिळाली तरी बोलण्याचे धाडस नव्हते. तो काळ असा होता की वडीलधा-यासमोर बोलताही येत नसे.
माझी मुंबईची मित्राची बायको संधी मिळवून द्यायचा आटोकाट प्रयत्न करीत असे. पण आम्ही मुलींच्या बाबतीत लाजाळूचं झाड. माझी थट्टा टोकाला जायची पण मी घाबरून शेतात पळून जाई. माझा चुलत भाऊ तिची खूप चेष्टा करायचा आणि ती ही त्याला प्रत्युत्तर द्यायची. असे आठ दिवस निघून गेले. आम्ही दुरूनच आमच्या सौ ला केवळ बघत बसायचो.
चुलत भावाच्या लग्नाला परत अमरावतीला गेलो. ( माझे लग्नही अमरावतीलाच झाले होते.) लग्नाच्या सगळ्या विधीत 'ही' एवढी उठून दिसत होती की अस्मादिकांचं लक्ष इतरत्र नव्हतंच. नव्या नवरीला घेऊन परत गावी आलो. दुस-या दिवशी पूजा घातली गेली. दोन जोडपी पूजेला बसलेली. माझा भाऊ अधून मधून त्याच्या बायकोशी बोलायचा तेव्हा मी त्याच्यावर डोळे वटारायचो. तो हसायचा.
दुस-या दिवशी अमरावतीला पूजेसाठी जायचे होते. आम्ही चौघे म्हणजे दोन्ही जोडपी ट्रेनने निघालो. माझा भाऊ प्रवासात दोघींशीही मनसोक्त गप्पा मारत होता. पण प्रवासात सुद्धा मी तिच्याशी बोललो तर कुणी पाहील तर नाही ना ही धाकधूक. वेडेपणाचा कळसच ! मधे एका स्टेशनवर चहा घेताना मी भावाला म्हटले, " भास्कर, चहा हवा का विचार तिला." तो म्हणाला, " अरे ! तू विचार ना !" तर मी डोळे वटारले.
अमरावतीला पूजा आटोपली. दुस-या दिवशी सकाळी अंबादेवीच्या मंदिरात ओटी भरायला जायचे होते. रिक्षात बसून निघालो. काहीतरी बोलायचे म्हणून मी हिंमत करुन विचारले," ओटी भरून लगेच निघायचे ना? " " थोडी खरेदी करायची आहे. " ती हळूच म्हणाली.
ओटीभरण व पूजा आटोपल्यावर आम्ही बाजूच्या मार्केटमधे गेलो. ती उत्साहाने दुकाने फिरू लागली. मला एक परिचित भेटले त्यांच्याशी गप्पा मारण्यात मी दंग झालो. त्या काळी विमा एजंट असल्यामुळे मी प्रत्येकाला गि-हाईक समजून वागायचो. त्यामुळे बराच वेळ आमच्या गप्पा रंगल्या. तेवढ्यात ती आली व मला म्हणाली, " पन्नास रुपये हवे होते. " मी खिशातील पन्नास रुपये तिला दिले आणि माझ्या डोळ्यासमोर वीज चमकली.
माझ्या खिशात फक्त दहा रुपये उरले होते. घरून निघताना मी खिशात किती पैसे आहे ते पाहिलेच नव्हते. घरून पैसे घेतलेच नव्हते. मला दरदरुन घाम फुटला. आता काय करायचे.!
रिक्षा करून आम्ही तिच्या माहेरी आलो. माझ्यासमोर एवढे संकट होते की रिक्षात तिच्या होणा-या स्पर्शाने सुद्धा माझ्या चित्तवृत्ती फुलल्या नाहीत. गावी कसे जायचे ? तिकिटाला पैसे कुठून येणार ? कुणाला मागायचे ? शरमेने काळाठिक्कर पडायची वेळ आली होती. रिक्षाचे पैसे चुकवून घरात आलो.
खिसा आता पूर्ण रिकामा झाला होता. मी घाम पुसत सोफ्यावर बसत होतो तोच आतून एक महिला बाहेर आली. माझ्याकडे बघून हसू लागली. " काय रे, ओळखलंस ना !" तिच्याकडे निरखून बघत मी म्हणालो, " तू मालती मावशी ना ! " तिने हसत हसत आपल्या मिस्टरांची ओळख करून दिली. " अरे हे आशाचे भाऊ लागतात ...दूरचे " मी चकित झालो. म्हणालो, " म्हणजे तू माझी मावशी आणि हिची वहिनी का ?" सगळे हसू लागले.
मी क्षणभर स्वत:ची व्यथा विसरलो. त्यांच्याशी गप्पांमध्ये रमलो. परत चिंता पोखरू लागली तेव्हा एक मार्ग सुचला की भावाला भेटून काहीतरी मार्ग निघेल. तेवढ्यात एक नातलग येऊन सांगू लागले की माझा भाऊ त्याच्या सासरी खेड्यावर गेलाय. माझे उरले सुरले अवसान गळाले.
आमच्या बोळवणीची पूर्ण तयारी झाली होती. सगळं सामान बांधून तयार झालं. रिक्षा आणायला कुणीतरी गेलं. मी रडकुंडीस आलो होतो. शेवटी विचार केला की प्रोफेसर साहेबांस ( सौ चे मोठे बंधू) स्पष्ट कल्पना द्यावी. होऊ झाली फजिती !
निघताना मी इतर ज्येष्ठांसोबत मावशीच्या पाया पडलो. " जोडीने पाया पड रे " मावशी म्हणाली. आम्ही पाया पडताच मावशीने माझ्या हाती शंभराची नोट दिली. त्या काळात .....शंभराची नोट.....
मंडळी....! माझी अवस्था काय सांगू ! आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन....साला मै तो साब बन गया ! आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. माझ्या डोळ्यासमोरून सारा घटनाक्रम सरकू लागला. आणि सगळी भीड सोडून मी बेधडक बायकोशी बोलायला सुरवात केली. भीड चेपल्यावर मी तिला माझी अवस्था विशद केली ......
आणि ती सहज म्हणाली," माझ्याकडे होते की पैसे...मला विचारायचे की !"
माझाच पोपट झाला.........
सुरेश इंगोले
अनिलहंबीर
Amey T Sonawane
With...
संतोष जगन्नाथ लहामगे
No comments:
Post a Comment