Monday 28 September 2020

रखमाचं गाणं

 #रखमाचं_गाणं


सकाळी फिरायला जायला सुरुवात केली आणि नवनवीन गोष्टी कळू लागल्या.


माझ्या घरासमोर सरकारी दवाखान्याला लागून काही चंद्रमौळी झोपड्या आहेत. पहिल्याच झोपडीत रखमा राहते. नवरा, मुलगी व मुलगा असा छोटासा संसार. प्रपंचाला हातभार लावायला छोटेसे दुकान चालवते. एवढ्या अडचणी सोसूनही आनंदी राहणारी.


         परवा सकाळी फिरायला निघालो तोच तिच्या झोपडीतून गाण्याचा आवाज ऐकू आला. गाण्याची चाल ओळखीची वाटली म्हणून थबकलो. आणि गाणं ऐकून चकितच झालो.

ती तल्लीन होऊन गात होती.


       " तुमी जवय आले

            काहून हासून राह्यले

                  तुमी असे कसे मले

                            सपनं दाखौले


           आता माह्यवालं मन

                   ना झोपते ना जागते

             काय करू बापा मले

                    कसंच्या कसं लागते....


            काय करू बापा मले...कसंच्या कसं लागते..।


मी तिला आवाज दिला. "रखमे !"

" काय जी काकाजी ?" ती लगबगीने बाहेर आली.

" किसना घरी नाही का ?"

" न्हाई जी ! टरक घिवून गेले.." 

" म्हणूनच.कसंच्या कसं लागते वाटते..? "मी असं म्हणताच ती ' काय काकाजी तुमी बी...!' म्हणत लाजून घरात पळाली.


        मी हसत हसत ' कुछ कुछ होता है ' गुणगुणत चालू लागलो.


                                    ©सुरेश इंगोले.

No comments:

Post a Comment