Thursday 8 October 2020

जीवनात बरेच प्रसंग येतात. बरे-वाईट सगळेच प्रसंग काही ना काही शिकवून मात्र जातात. सचोटीने जगण्याचे संस्कार बालपणापासूनच मिळाले. पण अन्याय, खोटेपणा, लबाडी या गोष्टींविरुद्व लढण्याचे बाळकडू सुद्धा मिळाले होते. आता या वयात गतायुष्याचे सिंहावलोकन करताना खूप घटना आठवतात. कधी मन विषण्ण होतं...कधी सुखावतं…कधी हसू येतं… वाटलं...या गोष्टी तुमच्याशी शेअर केल्या तर...तेवढाच विरंगुळा ! **** ***** ***** # होस्टेल_ लाईफ.. नागपूरला होस्टेलमध्ये राहत असताना माझे सहकारी सगळेच वयाने मोठे होते. कारण मी पंधराव्या वर्षीच हायर मॅट्रीक झालो होतो. माझ्यापुढे सगळेच थोराड दिसत. मला रॅगिंग करण्याचा प्रयत्न मी प्रत्येक वेळी हाणून पाडला होता. आम्ही आर्वीहून आठजण तेथे शिकायला आलो होतो. आमच्या ग्रुपमध्ये दांडगे मुलं होते. मी त्यांच्यामध्ये बारका असूनही कदाचित अभ्यासू व पुस्तकी किडा म्हणून माझा वरचष्मा होता. कुणाला नमवायचे, कुणाची खोड जिरवायची, कुणावर कुरघोडी करायची याचे नियोजन माझ्याकडे असायचे… बिंझाणी होस्टेलमध्ये एसबीसिटी कॉलेज व मोहता सायन्स कॉलेज चे विद्यार्थी होते. फायनलच्या एका सीनिअर विद्यार्थ्याशी आमच्यातील एकाचा उगाच वाद झाला. 'अपनी औकात में रहना' अशी धमकी देऊन तो गेला. त्याला औकात दाखवायची जबाबदारी माझ्यावर आली. रहस्यकथा, बाबुराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक हे माझे तत्कालीन गुरू… दोन दिवस अभ्यासपूर्वक फूलप्रूफ प्लान तयार झाला. रिहर्सल न करता टायमिंगची अचूक प्रॅक्टिस केली गेली. आणि…. प्लान अमलात आणण्याची वेळ आली. आमच्या होस्टेलची मेस मिश्रा चालवीत होते. त्यांचे आचारी, वाढपे सगळे बिहारी होते. हॉलमध्ये भिंतीलगत डेस्क बेंच वर आम्ही बसायचो. वाढपी मध्ये फिरत वाढत असायचे. त्यातला भाजी वाढणारा खूप त्रास द्यायचा. म्हणजे एका टोकापासून भाजी वाढायला सुरुवात केली की ती अर्ध्यातच संपायची. तो पुन्हा आतून भाजी घेऊन आला की परत त्याच टोकापासून सुरुवात करायचा. आम्ही दुसऱ्या टोकाला असल्यामुळे आमच्यापर्यंत तो येतच नसे. त्यांची मिश्राकडे कितीदा तक्रार केली पण काही फायदा होत नव्हता.जेवताना ताटात भाजी पडायला उशीर झाला तर काय अवस्था होते याचा अनुभव सर्वांनीच घेतला असेलच…. आज रात्री एका दगडात किती पक्षी मरतात ते पाहायचे होते. तो सीनिअर विद्यार्थी जेवायला येताच आम्ही काही जण त्याच वेळी जेवायला बसलो. आपापल्या जागा ठरताच आम्ही नेत्रपल्लवीने योजनेचे स्वरूप ठरवून घेतले. योजना अशी होती की भाजी वाढणारा दुसऱ्या फेरीत येताच दारात उभ्या मुलाला इशारा केला जाईल. तो खोलीतल्या मुलाला संकेत देईल. खोलीतला मुलगा बल्ब काढून त्यात नाणे टाकून बटन दाबताच होस्टेलचा फ्यूज उडेल. त्या क्षणिक अंधारात भाजीची गरम वाटी वाढप्याला फेकून मारली जाईल. क्षणातच शेजारच्या ताटातील वाटी आपल्या ताटात पटापट घेतली जाईल. योजनेप्रमाणे नेत्रपल्लवी झाली. क्षणात अंधार झाला. मी शेजाऱ्याच्या ताटातील बटाट्याच्या गरम भाजीची वाटी त्याला अंधारात फेकून मारली. एक किंकाळी हॉलमध्ये घुमली. थोड्या धावपळीनंतर मेणबत्त्या लावल्या गेल्या.ज्याच्या अंगावर भाजी सांडली तो थयथया नाचत होता. मिश्रा भाजीची वाटी कोणी फेकली म्हणून ओरडत होता. आम्ही जणू काही माहिती नाही असे निवांतपणे जेवत होतो. तेवढ्या वेळात फ्यूज टाकला गेला आणि वीज आली. हॉलमध्ये वॉर्डनसुद्धा आले होते. ' किस की थाली में कटोरी नहीं है?' मिश्राजी ओरडले. आणि त्याचवेळी तो सीनिअर विद्यार्थी भांबावून जोरात बोलला, " माझ्या ताटातील वाटी कोणी घेतली.?" सगळ्यांचे लक्ष त्याच्या ताटाकडे गेले. मी वाटी फेकून मारली नाही असे त्याने सांगण्याचा खूप प्रयत्न केला. पण वॉर्डन व मिश्रा यांच्या तावडीतून तो सुटू शकला नाही. या सगळ्या प्रकरणात आमचा काही सहभाग असेल याची साधी शंकाही कोणाला आली नाही. किंबहुना आम्ही ती येणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. © सुरेश इंगोले

            


         जीवनात बरेच प्रसंग येतात. बरे-वाईट सगळेच प्रसंग काही ना काही शिकवून मात्र जातात. 


      सचोटीने जगण्याचे संस्कार बालपणापासूनच मिळाले. पण अन्याय, खोटेपणा, लबाडी या गोष्टींविरुद्व लढण्याचे बाळकडू सुद्धा मिळाले होते. आता या वयात गतायुष्याचे सिंहावलोकन करताना खूप घटना आठवतात. कधी मन विषण्ण होतं...कधी सुखावतं…कधी हसू येतं…


      वाटलं...या गोष्टी तुमच्याशी शेअर केल्या तर...तेवढाच विरंगुळा !


          ****      *****     *****

    # होस्टेल_ लाईफ..



    नागपूरला होस्टेलमध्ये राहत असताना माझे सहकारी सगळेच वयाने मोठे होते. कारण मी पंधराव्या वर्षीच हायर मॅट्रीक झालो होतो. माझ्यापुढे सगळेच थोराड दिसत. मला रॅगिंग करण्याचा प्रयत्न मी प्रत्येक वेळी हाणून पाडला होता. आम्ही आर्वीहून आठजण तेथे शिकायला आलो होतो. आमच्या ग्रुपमध्ये दांडगे मुलं होते. मी त्यांच्यामध्ये बारका असूनही कदाचित अभ्यासू व पुस्तकी किडा म्हणून माझा वरचष्मा होता. कुणाला नमवायचे, कुणाची खोड जिरवायची, कुणावर कुरघोडी करायची याचे नियोजन माझ्याकडे असायचे…


   बिंझाणी होस्टेलमध्ये एसबीसिटी कॉलेज व मोहता सायन्स कॉलेज चे विद्यार्थी होते. फायनलच्या एका सीनिअर विद्यार्थ्याशी आमच्यातील एकाचा उगाच वाद झाला. 'अपनी औकात में रहना' अशी धमकी देऊन तो गेला. त्याला औकात दाखवायची जबाबदारी माझ्यावर आली.

रहस्यकथा, बाबुराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक हे माझे तत्कालीन गुरू…


    दोन दिवस अभ्यासपूर्वक फूलप्रूफ प्लान तयार झाला. रिहर्सल न करता टायमिंगची अचूक प्रॅक्टिस केली गेली. आणि….


    प्लान अमलात आणण्याची वेळ आली.


आमच्या होस्टेलची मेस मिश्रा चालवीत होते. त्यांचे आचारी, वाढपे सगळे बिहारी होते. हॉलमध्ये भिंतीलगत डेस्क बेंच वर आम्ही बसायचो. वाढपी मध्ये फिरत वाढत असायचे. त्यातला भाजी वाढणारा खूप त्रास द्यायचा. म्हणजे एका टोकापासून भाजी वाढायला सुरुवात केली की ती अर्ध्यातच संपायची. तो पुन्हा आतून भाजी घेऊन आला की परत त्याच टोकापासून सुरुवात करायचा. आम्ही दुसऱ्या टोकाला असल्यामुळे आमच्यापर्यंत तो येतच नसे. त्यांची मिश्राकडे कितीदा तक्रार केली पण काही फायदा होत नव्हता.जेवताना ताटात भाजी पडायला उशीर झाला तर काय अवस्था होते याचा अनुभव सर्वांनीच घेतला असेलच….


   आज रात्री एका दगडात किती पक्षी मरतात ते पाहायचे होते. तो सीनिअर विद्यार्थी जेवायला येताच आम्ही काही जण त्याच वेळी जेवायला बसलो. आपापल्या जागा ठरताच आम्ही नेत्रपल्लवीने योजनेचे स्वरूप ठरवून घेतले. 


     योजना अशी होती की भाजी वाढणारा दुसऱ्या फेरीत येताच दारात उभ्या मुलाला इशारा केला जाईल. तो खोलीतल्या मुलाला संकेत देईल. खोलीतला मुलगा बल्ब काढून त्यात नाणे टाकून बटन दाबताच होस्टेलचा फ्यूज उडेल. त्या क्षणिक अंधारात भाजीची गरम वाटी वाढप्याला फेकून मारली जाईल. क्षणातच शेजारच्या ताटातील वाटी आपल्या ताटात पटापट घेतली जाईल.


 योजनेप्रमाणे नेत्रपल्लवी झाली. क्षणात अंधार झाला. मी शेजाऱ्याच्या ताटातील बटाट्याच्या गरम भाजीची वाटी त्याला अंधारात फेकून मारली. एक किंकाळी हॉलमध्ये घुमली. थोड्या धावपळीनंतर मेणबत्त्या लावल्या गेल्या.ज्याच्या अंगावर भाजी सांडली तो थयथया नाचत होता. मिश्रा भाजीची वाटी कोणी फेकली म्हणून ओरडत होता. आम्ही जणू काही माहिती नाही असे निवांतपणे जेवत होतो. तेवढ्या वेळात फ्यूज टाकला गेला आणि वीज आली. हॉलमध्ये वॉर्डनसुद्धा आले होते. 

' किस की थाली में कटोरी नहीं है?' मिश्राजी ओरडले. 

आणि त्याचवेळी तो सीनिअर विद्यार्थी भांबावून जोरात बोलला, " माझ्या ताटातील वाटी कोणी घेतली.?" 


सगळ्यांचे लक्ष त्याच्या ताटाकडे गेले. मी वाटी फेकून मारली नाही असे त्याने सांगण्याचा खूप प्रयत्न केला. पण वॉर्डन व मिश्रा यांच्या तावडीतून तो सुटू शकला नाही.


      या सगळ्या प्रकरणात आमचा काही सहभाग असेल याची साधी शंकाही कोणाला आली नाही. किंबहुना आम्ही ती येणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली.


                    © सुरेश इंगोल

No comments:

Post a Comment